Our Archive

Our Archive

अ‍ॅग्रोजेनिक्स - Agrogenix > ब्लॉग > 2021

कोरोना नंतरच्या काळात आपल्या सगळ्यांची आर्थिक स्थिती ढासाळली आहे व त्यात आपल्या सारख्या शेतकऱ्याची तर अधिकच.आजच्या काळात तंत्रज्ञान व त्यासोबत तरुण पिढी, शेती करण्याच्या मागावर लागली आहे. पण या सगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी कागदावरच छान दिसतात!! असे का? कारण एकट्या शेतकऱ्याला तंत्रज्ञान हाताळणे कठीण जाते, त्याला शेती करण्याची एखादीच आधुनिक पध्दत माहीत असते व तंत्रज्ञान वापरण्यासाठी […]

Read More

सेंद्रिय शेतीचा उद्देश हा माती, हवा, पशू, पक्षी, मनुष्य व पर्यावरण यांचे आरोग्य वाढविणे हा आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते. सेंद्रिय शेतीतून निघणारे उत्पन्न जरी कमी येत असले तरी ते सकस असते. सेंद्रिय शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खर्च कमी होऊ शकतो. किमान एका देशी गायीचे पालन केल्यास जीवामृत, घनजीवामृत, […]

Read More

गांडूळ खताचे शेतीसाठी फायदे गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. गांडूळाला ‘शेतकरी मित्र’ असे ही संबोधले जाते. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला चोवीस तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी […]

Read More
सब पे भारी सोयाबीन दसहजारी !!

“सोयाबीन ने ओलांडला 10,000 चा यशस्वी टप्पा”, ऐकायला ही किती छान वाटतं ना… प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहर्‍यावर या दहा हजारी टप्यामुळे एक छानशी चमक मात्र नक्कीच आलेली असेल. तो आता सध्याच्या पिकाचे किती रुपये आले असते याचा दिवसातून 2-3 वेळेस विचार नक्कीच करतो. पण हेच भाव पुढे असेच राहतील का ? हा महत्त्वाचा प्रश्न. आता हे […]

Read More

मी मोठं होऊन डॉक्टर होणार… मी इंजिनिअर झाल्यावर मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करणार… मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे… मला ना हायफाय जॉब करायचाय… या इच्छा आकांक्षा आपण रोज कुठे ना कुठेतरी ऐकतच आहोत. कुठे कशाला, आपल्याच घरातसुद्धा ! पण, “मला ना, भारी शेतकरी व्हायचंय”, असं किती टक्के विद्यार्थी ठामपणे म्हणतात? म्हणणार तरी कसे ते, जसं […]

Read More

शेती आणि शेतकरी या विषयावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तसेच शेती व्यवसाय कशाप्रकारे फायद्याचा व्यवसाय होईल, यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. सध्या शेती ही दोन प्रकारे केली जात आहे. ती म्हणजे जैविक आणि रासायनिक शेती. जैविक शेती म्हणजे नेमकं काय? तर जी शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते, ती शेती म्हणचे जैविक शेती. […]

Read More

सध्या शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसीत होत आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, नवनवीन संकल्पना वापरल्या जात आहेत. त्या संकल्पनेला सत्यात उतरवण्याचं काम शेतकरी उत्पादन कंपन्या करत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांचं वारं पूर्ण देशभर वाहत आहे. त्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अ‍ॅग्रोजेनिक्स कंपनी प्रयत्न करत आहे. अ‍ॅग्रोजेनिक्स कंपनीचे शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यात मदत करण्याचे उद्धिष्ट आहे. तसेच […]

Read More

१ मे, १९६० महाराष्ट्राच्या निर्मितीचा दिवस. हा तोच महाराष्ट्र ज्याला आपण संयुक्त महाराष्ट्र म्हणतो. याच दिवशी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. आपला हा महाराष्ट्र संयुक्त असला तरी या राज्याचे चार प्रमुख भाग पडतात. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि आपला मागास मराठवाडा. आपला मराठवाडा मागास का राहिला ?? मराठवाडा मागास […]

Read More

मी मराठवाड्यातील शेतकरी. मी नेहमी म्हणतो, ‘आजकाल शेती परवडत नाही.’ पण मी कधीच विचार केला नाही कि शेती का परवडत नाही? त्याला अनेक कारणे आहेत. आपण त्यातल्या एका विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे “जमिनीची भूक”. मी जमिनीची भूक असं म्हटलो, त्याला कारण आहे. आपल्याला माहीतच नसतं कि जमिनीला किती आणि कशाची भूक लागलीये. आणि […]

Read More

शेतीविकास हा मानवाच्या सांस्कृतिक विकासाशी निगडित असतो. फक्त कोरोनाच नाही तर असे विविध प्रकारचे आजार आहेत जे माणसाच्या पूर्ण शरीराला रिक्त करून सोडतात. जगात, स्वतःचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ति मजबूत करणे हेच एकमेव पर्याय राहिले आहे. सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात व संपूर्ण जगात वाढत आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. असे म्हटले […]

Read More